दरोडेखोर समजून तिघा प्रवाशांचा दगडाने ठेचून खून

पालघर । खानवेल गावाकडे जाणार्‍या प्रवाशांना दरोडेखोर समजून यातील तिघांचा ग्रामस्थांनी दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना दाभाडी-खानवेल मार्गावर घडली आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, सध्या मुंबईसारख्या महानगरांमधून अनेक जण आपापल्या गावाकडे निघाले आहेत. यातच लॉकडाऊनमध्ये दरोडेखोरांचा वावर वाढला असल्याची अफवा पालघरसह परिसरात पसरली आहे. या अनुषंगाने काल रात्री नाशिक येथून खानवेल या आपल्या गावाकडे निघालेल्या प्रवाशांच्या गाडीवर ग्रामस्थांनी हल्ला चढविला. यात तिघांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यात गाडीचा चालक आणि दोन प्रवाशांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यातील राईनपाडा या गावात सोशल मीडियातील अफवेमुळे भिक्षुकांचे सामूहिक हत्याकांड घडले होते. याचीच पुनरावृत्ती पालघरमध्ये झाल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात अद्याप पोलीस प्रशासनातर्फे विस्तृत माहिती देण्यात आलेली नाही.

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content