तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात शेतात वास्तव्य करणार्‍या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना २५ सप्टेंबर रोजी घडली होती.  याप्रकरणी शनिवार ९ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

रोजगारानिमित्त अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय जळगाव तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहेत. शेतात काम करून कुटूंबिय त्याच ठिकाणी राहतात. २५ सप्टेंबर रोजजी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरून कुठेतरी  निघून गेली. रात्री अकरा वाजेपर्यंत कुटूंबियांनी मुलीची प्रतीक्षा केली मात्र ती परत घरी आली नाही. अल्पवयीन मुलीचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून  आली नाही. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी फूस लावून पळवून नेल्याची खात्री झाल्यावर  याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे हे करीत आहेत.

Protected Content