तामिळनाडूत भीषण अपघात ; २० प्रवासी जागीच ठार

accident5 201905244186

 

कोयंबतूर / तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था) तामिळनाडूत आज पहाटे खासगी ट्रॅव्हल्स बस आणि कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात २० प्रवासी जागीच ठार झाले आहेत.

 

कोयंबतूर-सलेम हायवेवर अचानक टायर फुटल्याने कंटेनर अनियंत्रित झाले. यावेळी कंटेनरची स्पीड खूप होती आणि कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला जाऊन धडकले. अपघात इतका भीषण होता की बसच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या. यामध्ये इतर 23 जण जखमी असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशासनाने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. मृतांमध्ये 14 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे. अपघातग्रस्त बस वॉल्वो होती. तसेच त्यामध्ये 50 पेक्षा अधिक प्रवाशांच्या बसण्याची व्यवस्था असते. अपघातातील मृत आणि जखमींमध्ये प्रामुख्याने केरळच्या स्थानिकांचा समावेश आहे.

Protected Content