ट्रोलर्सच्या फौजेलाही ‘हा’ सल्ला द्या- सुरजेवाला

नवी दिल्ली । पंतप्रधान मोदी यांनी विखारी भाषेचा प्रयोग करणार्‍या ट्रोलर्सच्या फौजेलाही सोशल मीडिया सोडण्याचा सल्ला द्यावा अशी खोचक मागणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया सोडण्याची घोषणा केल्यानंतर याचे राजकीय क्षेत्रात पडसाद उमटू लागले आहेत. राहूल गांधी यांनी मोदी यांना सोशल मीडिया नव्हे तर घृणा सोडा असा खोचक सल्ला दिला. तर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी देखील या प्रकरणावरून एक खोचक ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये सुरजेवाला यांनी म्हटले आहे की, ”सन्माननिय पंप्रधानजी, तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही त्या ट्रोलर्सच्या फौजेला हा सल्ला द्या की, जे तुमच्या नावाने दर सेकंदाला अपशब्दांचा वापर करत धमक्या देतात.” तर अखिलेश यादव, तेजस्वी यादव, कन्हैया कुमार यांच्यासह अन्य नेत्यांनीदेखील यावरून मोदींची खिल्ली उडविली आहे.

Protected Content