जिल्ह्यात आज ४३ कोरोनाबाधित ; ६ तालुके निरंक

 

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा आरोग्य प्रशासनाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यातून केवळ ४३ रूग्ण बाधित आढळून आले आहे तर ५२ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. जिल्ह्यातील सहा तालुका निरंक असल्याचे दिसून येत आहे.

आजची आकडेवारी

आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील पाचोरा, धरणगाव, यावल, एरंडोल, जामनेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात एकही रूग्ण आढळून आलेले नाहीत. तर इतर उर्वरित जळगाव शहर-११, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-८, अमळनेर-१, चोपडा-३, भडगाव-८, रावेर-१, पारोळा-३, चाळीसगाव-४, बोदवड-३ असे एकुण ४३ रूग्ण बाधित आढळलेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालात आज एकुण रूग्ण संख्या ५३ हजार ५३२ वर पोहचली आहे. तर ५१ हजार ६३९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. उर्वरित ६२१ रूग्ण वेगवेगळ्या रूग्णालयात उपचार घेत आहे. तर आज ५२ रूग्ण बरे होवून परतलेत. आज एका रूग्णांचा मृत्यू झाला.

Protected Content