जवखेडा येथील शेतकऱ्याला तिघांकडून मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील जवखेडा येथे शेताच्या बांधाच्या कारणावरून एकाला लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर तो दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी रविवार, दि. १७ जुलै रोजी सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताराम विक्रम गोपाळ (वय- ५३) रा. जवखेडा ता. जळगाव हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात त्यांचे जवखेडा शिवारात शेत आहे.

शेतातील बांधाच्या कारणावरून शनिवारी, १६ जुलै सकाळी ६ वाजता त्यांच्या शेजारी राहणारे कल्पना लोटन गोपाळ, योगेश लोटन गोपाळ आणि लोटन राजाराम गोपाळ सर्व रा. जळगाव यांनी शांताराम गोपाळ यांना लाकडी दांडक्याने डोक्यावर मारहाण करून दुखापत केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण केले.

त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. रविवारी १७ जुलै रोजी सकाळी शांताराम गोपाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कल्पना लोटन गोपाळ योगेश लोटन गोपाळ लोटन राजाराम गोपाळ या ३ जणांनी विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content