जळगावात रेल्वेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

suside

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील खंडेराव नगरातील एका तरुणाचा रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यु झाल्याची घटना काल (दि.२६) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सकाळी ८.३० वाजता रेल्वेमार्गावर मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरातील रहिवाश्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा त्याची ओळख पटून पोलिसांना कळवण्यात आले.

 

गजानन दलपत पाटील (वय-२६) असे मयत तरुणाचे नाव असून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. हरिविठ्ठलनगर नगरातील रहिवासी गजानन हातमजुरी करुन त्याचा व आई रुख्मीणीबाईचा उदरनिर्वाह करीत होता. गेल्यावर्षीच त्याच्या वडीलांचे अकाली निधन झाल्याने घरात दोन्ही माय-लेकच होते.

काल रात्री ११.३०च्या सुमारास शौचास जातो, असे सांगून गजानन घरासमोरच रेल्वे रुळांच्या बाजुला गेला होता. रात्री घरी परतला नाही, म्हणुन आई वाट पाहत होती. सकाळी रेल्वे रुळा जवळ मृतदेह पडल्याचे परिसरातील रहिवाशांना आढळून आल्याने नागरिकांनी धाव घेतली. मृतदेह गजाननचा असल्याची ओळख पटल्यावर पोलिसांना कळवण्यात आले. मृतदेहाचा पंचनामा करुन त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रामानंदनगर पोलिसांत या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content