चोपडा येथे लालबावटा शेतमजूर युनियनचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा

चोपडा प्रतिनिधी । तालुका लाल बावटा, शेतमजूर युनियनतर्फे शेतमजूर आदिवासींचां धडक मोर्चा देण्यात आला. हा मोर्चा बसस्थानक, आयटक ऑफिस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळामार्गे आझाद चौक बोहरा गल्ली असा मोर्चा काढण्यात आला. शेतमजूर आदिवासींचा तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

मोर्चात निर्धन आदिवासी दलित भटके-विमुक्त निर्धन जनतेला त्रासदायक एन आर सी कायदा रद्द करा. शेतमजुरांना दोन रुपये किलोने 35 किलो धान्य द्या, रोख सबसिडी नको, तालुक्यातील शेतमजुरांना रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड वाटप करा, त्यांना काम द्या, शेतमजुरांना आदिवासींना राहत्या घराची जागा नावे करून घरकुल द्या, ड यादीतील लोकांना घरकुले द्या, शेतमजुरांचे थकीत कर्ज माफ करा, बचत गटाला १० लाख रुपये मुद्रा योजनेखाली कर्ज मिळावे, तसेच मोहीदा आदिवासी भिल्ल वस्तीत रस्ता गटार दिवाबत्तीची सोय करा आदी मागण्यांसाठी घोषणा देत तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोहीदा वढोदा, अजनतीसिम, नागलवाडी, आडगाव, नारद, खरद, लासूर, कुर्वेल, शेवरे बुद्रुक, उमर्टी भा येतील शेतमजूर सहभागी होते. मोर्चाचे नेतृत्व शेतमजूर नेते अमृत महाजन, वासुदेव कोळी, वना माळी, हिराबाई सोनवणे, रेखाबाई भालेराव, भागवत पाटील, प्रकाश बुवा, रतिलाल भिल, पर्वताबाई बाविस्कर यांनी केले.

तहसीलदार गावित यांनी चर्चा करून कार्यवाहीचे आश्वासन दिले. मोर्चासाठी हिराबाई सोनवणे, संजुबाई पाटील, आबा भील, शिवाजी पाटील, गोपाळ भील, छोटू कोळी, लताबाई सोनवणे, राजेंद्र पारधी, नवाब तडवी, प्रकाश बुवा, संदीप कोळी, सूर्यभान बारेला, प्रेमसिंग बारेला यांच्यासह इतरांनी सहभाग नोंदविला होता. येत्या २० मार्च रोजी दिल्ली येथे अखिल भारतीय खेत्मजदुर युनियन तर्फे देशव्यापी धरणे आंदोलनासाठी शेतमजूरांनी भुसावळ रेल्वे स्टेशनवर जमावे असे आवाहन कॉम्रेड महाजन यांनी केले.

Protected Content