चैतन्य तांडा क्र.४ येथे शिवजयंती उत्साहात साजरी

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. या पार्श्वभूमीवर विकास सोसायटीचे चेअरमन दिनकर राठोड यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चैतन्य तांडा ग्रामपंचायतीत कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत आज शिवजयंती साजरी करण्यास प्रोत्साहित करत जयंती साजरी करण्यात आली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तालुक्यातील चैतन्य तांडा क्र.४ येथे कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, ग्रामपंचायत सदस्य भावलाल चव्हाण, वसंत राठोड, प्रवीण चव्हाण , राजेंद्र चव्हाण, पदम भवर, मोरसिंग राठोड, उदल राठोड, मधुकर राठोड, रघुनाथ राठोड, ऊदल पवार, व करगाव विकास सोसायटीचे चेअरमन दिनकर राठोड आदी उपस्थित होते. सर्वांनीच नियमांचे पालन करून यावेळी जयंती साजरी केली. कमीत कमी लोकांमध्ये ही जयंती साजरी व्हावी यासाठी करगाव विकास सोसायटीचे चेअरमन दिनकर राठोड यांनी प्रोत्साहित केले.

 

 

Protected Content