चुप्पी तोडा, प्रश्नांचा सामना करा

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । ‘एकटंच टनलमध्ये हात हलवणं सोडा आणि आपली चुप्पी तोडा. प्रश्नांचा सामना करा, देश तुम्हाला खूप काही विचारतोय’ असं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय.

कृषी कायद्याविरोधात पंजाबमध्ये तीन दिवसीय ‘किसान यात्रा’ पार पडली आहे. यानंतर राहुल गांधी हरयाणाला जाणार आहेत . दरम्यान बुधवारी सकाळी त्यांनी ट्विटरवरून पुन्हा एकदा पंतप्रधानांवर टीका केलीय. राहुल गांधी यांनी गेले तीन दिवस पंजाबमध्ये ट्रॅक्टर रॅली काढली होती. त्यानंतर ते मंगळवारी हरयाणाला पोहचलेत. इथे ते दोन दिवस सभा घेणार आहेत. त्यानंतर दिल्लीत या ‘शेती वाचवा यात्रे’चा शेवट होणार आहे. मंगळवारी एका पत्रकार परिषदेतही राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला होता. ‘तीन कृषी कायद्यांद्वारे शेतकऱ्यांनाच संपवलं जातंय आणि मोठ्या उद्योगपतींसाठी मार्ग मोकळा केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या तीन कायद्यांची व्यवस्थित जाणीव नाही’ असा घणाघात गांधी यांनी केला.

Protected Content