चाळीसगाव येथे संजय गांधी योजनेच्या पहिल्या बैठकीत; बाराशे प्रकरणे मंजूर!

*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | संजय गांधी निराधार योजनेची पहिली बैठक नुकतीच भगवान पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात पार पडली. या बैठकीत एकूण १२०१ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली आहे.

चाळीसगाव तालुका संजय गांधी निराधार योजनेची पहिली बैठक भगवान बापु पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ३१ जानेवारी रोजी पार पडली. सचिव व तहसीलदार अमोल मोरे यांच्या उपस्थितीत हि बैठक पार पडली. यावेळी सर्व समिती सदस्य उपस्थित होते. दरम्यान या बैठकीत जुन २०२१ ते डिसेंबर २०२१ या काळातील एकुण १८४९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यापैकी १२०१ प्रकरणे मंजूर करण्यात आली तर ६४८ प्रकरणे नामंजूर करण्यात आली आहे. तसेच संबंधित यादी ही तहसील कार्यालय व तलाठी कार्यालयात उपलब्ध झाली आहे. त्यामुळे सदर योजनेबाबत ज्यांनी आवेदन केले आहेत. त्यांनी तातडीने सदर ठिकाण जाऊन आपल्या नावाची खात्री करून घेण्याचे आवाहन सर्व समिती सदस्यांनी केले आहे.

Protected Content