चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा पलटी; शेतमजूर महिला जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावाजवळ चालकाचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा पलटी झाल्याची घटना मंगळवारी ४ जुलै रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. यात दोन प्रवाशी किरकोळ जखमी झाले.याप्रकरणी रात्री  ८ वाजता रिक्षा चालकावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील रिक्षा चालक फारूख अली मोहम्मद अली रा. जळगाव हा रिक्षाचालक त्यांची रिक्षा क्रमांक (एमएच १९ सीडब्ल्यू ४३८४) ने शेतात जाणाऱ्या महिला मजूरांना घेवून ममुराबाद येथे शेतात घेवून जाण्यासाठी मंगळवारी ४ जुलै रोजी सकाळी निघाला. ममुराबाद नजीकच्या रोडवरील हॉटेल मितवा जवळ रिक्षाने जात असतांना त्यांचा भरधाव रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षात बसलेले चार जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी रात्री ८ वाजता जखमी महिला मंगलाबाई राजू सपकाळे (वय-४६) रा.वाल्मिक नगर, आसोदा रोड, जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात रिक्षा चालक  फारूख अली मोहम्मद अली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे करीत आहे.

Protected Content