चारित्र्याच्या संशयातून पतीने केला पत्नीचा खून !

chalisgaon muder

अहमदनगर (वृत्तसंस्थ) चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा शेतात खून करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील एकरुखे गावात घडली आहे.

 

सुनील लेंडे हा पत्नी छाया हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी शेतात गेल्यानंतर सुनील याने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडके मारून तिला जखमी केले. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पत्नीचा मृतदेह शेतात ठेवून तो घरी आला. त्यानंतर रात्री एक पोते व पेट्रोल नेऊन पत्नीला शेतापासून जवळच जाळून टाकले. त्यानंतर स्वतःहून तो राहाता पोलीस ठाण्यात हजर होऊन पत्नीचा खून केल्याचे सांगितले.

Protected Content