खून प्रकरण : रस्त्यावर उतरणाऱ्या जमावावर गुन्हा दाखल

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तरूणााच्या खून प्रकरणात मारेकऱ्या ताब्यात देण्याची मागणी करत मयताच्या नातेवाईकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको करत ठिय्या आंदोलन केले होते. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात १५० जणांवर जमावबंदीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्पीकरचा आवाज कमी करा असे सांगण्यासाठी गेलेल्या एका भिल्ल (आदिवासी)समाजाचा युवकाचा खून झाल्याची घटना अमळनेर शहरातील दाजीबा नगरात घडली होती. मयत अक्षय भिल याचे नातेवाईक व समाज बांधव यांच्याकडून या घटनेचा काल तीव्र रोष व्यक्त करीत, धुळे महामार्गावर सुमारे अडीच ते तीन तास ठिय्या आंदोलन केले होते. यामुळे सर्व सामान्य जनतेला वेठीस धरणे, दंगल, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, अश्लील शिवीगाळ करणे, कायदा पायदळी तुडवणे, पोलिसांना कुचकामी समजणे हा प्रकार घडला होता. आंदोलनकर्त्यांचे असे विविध प्रकारचे कृत्ये सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाले आहेत. शिवाय या आंदोलनाचे व्हिडीओ चित्रीकरण देखील पोलीस यंत्रणेकडे असून, त्या अनुषंगाने आंदोलनात नेतृत्व करणाऱ्यांसह सुमारे १५० जणांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे रागाच्या भरात घेतलेली टोकाची भूमिका चांगलीच अंगाशी आली आहे .पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक राकेश परदेशी करीत आहेत

Protected Content