कोरोना : सर्वोच्च न्यायालयाला चिंता

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । सण उत्सवाच्या काळात कोरोनाचा प्रसार वाढून दुसरी लाट येऊ शकते, असा इशारा केंद्रीय समितीने दिला होता. तशीच परिस्थिती असून, सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रासह चार राज्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

उपचार व मृतदेहांच्या हाताळणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्या अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली खंठपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयानं दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि आसाम या राज्यातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. चार राज्यांमध्ये संसर्गामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली असून, दोन दिवसांत अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 

Protected Content