कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईत भारत मानवतेच्या बाजूने

नवी दिल्ली :वृत्तसंस्था । कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईत मानवतेच्या मदतीसाठी भारत उभा राहील लस उत्पादन आणि वितरणासाठी मदत करेल, असे भारताने विविध देशांना सांगितले भारतातील विविध देशांचे राजदूत आणि उच्चायुक्तांसोबत चर्चा करताना परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृगला यांनी हा संदेश दिला.

लस मिळावी यासाठी जगातील अनेक देश भारताच्या संपर्कात असल्याचे शृगला म्हणाले. मानवतेची संपूर्ण मदत करण्याचे हे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वचन मी पुन्हा एकदा सांगतो असेही शृंगला पुढे म्हणाले. ज्या देशांना लस चेन आणि साठवण क्षमता वाढवायची आहे, अशा देशांना भारत मदत करेल, असे ते म्हणाले.

भारत देश हा लस विकसित करण्याच्या कामात अग्रेसर असल्याचे शृंगला यांनी म्हटले. आम्ही आमच्या सहकारी देशांनी लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करण्याबाबत प्रयत्नशील आहोत. जर इतर देशांची इच्छा असल्यास आम्ही त्यांच्या सहकार्याने लशीच्या संयुक्त उत्पादनाबाबत देखील विचार करू शकतो, असेही ते म्हणाले.

भारतात काही आठवड्यांपूर्वी एक लाखाच्या आसपास नवे रुग्ण वाढत होते, मात्र आता ती संख्या ५० हजारांपर्यंच खाली घसरली असल्याची माहिती त्यांनी दिली.

आम्ही संसर्गाबाबत सतर्क असून संपूर्ण देशात आपल्या अनुभवाच्या आधारे आम्ही नवी रणनीती तयार करत राहतो. भारतात रुग्ण बरे होण्याचा दर आता ९१.९६ टक्के इतका आहे ( ३ नोव्हेंबर, २०२० पर्यंत). तर, मृत्युदर हा १.४९ टक्के इतका आहे, अशी माहिती परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी दिली.

Protected Content