कोरोना : जिल्ह्यात आज पाच तालुके निरंक; आज ४४ रूग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यातून ४४ रुग्ण आढळून आले आहे तर ९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्याचा रिकव्हरी दर ९६.०४ टक्क्यांवर पोहचला आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर १३, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-१३, अमळनेर-०, चोपडा १, पाचोरा-०, भडगाव-४, धरणगाव-०, एरंडोल-१, जामनेर-०, रावेर-३, पारोळा-१, चाळीसगाव-१, मुक्ताईनगर-१, बोदवड-० असे एकूण ४४ आज आढळून आले आहे.

आजच्या अहवालात पाच तालुके निरंक असल्याचे आहे. जिल्ह्यात त्यांचा ५३ हजार १९३ या पैकी ५१ हजार ८६ कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. तर उर्वरित ८४० रूग्ण कोवीड रुग्णालयात उपचार घेत आहे. आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकूण १ हजार २६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झाली आहे.

Protected Content