कोरोना : चार तालुके निरंक; जिल्ह्यात १६१ बाधित रूग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून दिवसेंदिवस कोरोना रूग्ण संख्या कमी होतांना दिसून येत आहे. जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात १६१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ४३३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज चार तालुके निरंक असल्याचे दिसून येत आहे. 

जिल्ह्यातील आजची आकडेवारी 

जळगाव शहर-२१, जळगाव ग्रामीण-६, भुसावळ-२८, अमळनेर-४, चोपडा-०, पाचोरा-२, भडगाव-१, धरणगाव-०, यावल-१६, एरंडोल-२, जामनेर-४, रावेर-६, पारोळा-७, चाळीसगाव-६३, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १६१ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आजपर्यंत  १ लाख ३९ हजार ८२७ बाधित रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी १ लाख ३१ हजार ३८४ रूग्ण बरे होवून घरी पतरले. तर ५ हजार ९१५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात ४ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे. 

Protected Content