कोरेगाव-भीमा दंगल : संभाजी भिडेंनी वेगळे वातावरण तयार केले : शरद पवार

4Sharad 20Pawar 201 3

 

मुंबई (वृत्तसंस्था) कोरेगाव-भीमा येथे स्थानिक आणि बाहेरुन येणाऱ्या लोकांनामध्ये कधी कटुता नव्हती. पण संभाजी भिडे यांनी कोरेगाव-भीमामध्ये वेगळ वातावरण तयार केला, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

 

कोरेगाव-भीमा आणि एल्गार परिषदेसंबंधीच्या पत्रकार परिषदेत आज शरद पवार बोलते होते. यावेळी पवार म्हटले की, कोरेगाव-भीमा येथे विजय स्तंभाच्या दर्शनासाठी लोक जमायचे. स्थानिक आणि बाहेरुन येणाऱ्या लोकांनामध्ये कधी कटुता नव्हती. पण संभाजी भिडे यांनी कोरेगाव-भीमामध्ये वेगळ वातावरण तयार केले. कोरेगाव-भीमाच्या लढाईत काही भारतीय ब्रिटिशांच्या बाजूने लढले. या लढाईत पेशव्यांचा पराभव झाला हे वास्तव आहे. एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा या दोन वेगवेगळया घटना आहेत. एल्गार परिषदेत १०० पेक्षा जास्त संघटना सहभागी होत्या असे शरद पवार म्हणाले.

Protected Content