कोचुर येथे वीज तार तुटून अंगावर पडल्याने ५ बकऱ्यांचा मृत्यू

सावदा प्रतिनिधी ।  येथून जवळच असलेल्या कोचुर खुर्द गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील विजेचा खांबावरील तार तुटून पाच बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सकाळी बकऱ्यांना चारण्यासाठी नेत असतांना हा अपघात घडला असून  संबधितांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

 

कोचुर येथील डॉ. बाबासाहेब  आंबेडकर नगरात विजेचा खांबावरील तार तुटून अचानक चरण्यासाठी जात असलेल्या ५ बकऱ्यांवर पडली. यांत  गौतम तायडे यांच्या मालकीच्या तीस हजार किमतीच्या तीन, युवराज तायडे यांच्या मालकीची सात हजार किमतीची १तर संतोष तायडे यांच्या मालकीची सात हजार किमतीची एक अशी अदांजे ४४ हजार रुपयाच्या बकरीधन मृत्यू पडल्याने सकाळी एकच गोंधळ उडाला. महावितरणच्या गलथान कारभारानेचा आमचे नुकसान झाल्याचा आरोप करत  संबधितांनी  नुकसानभरपाईची मागणी केली आहे. महावितरणच्या कारभार विरोधात वातवरण तापल्याने सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि देविदास इंगोले हे आपल्या पथकासह लागलीच घटनास्थळी झाले. त्यांनी संबधितांची समजूत घालून वातवरण शांत केले.

Protected Content