कॉंग्रेस पक्ष अक्कलशून्स : प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कॉंग्रेस पक्ष अक्कलशून्य असून हा पक्ष मोदी-शहांना शरण गेल्याची घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

 

टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत भाष्य केले आहे. यात म्हटले आहे की, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी माझ्याकडे एकही मत नाही. पण सध्या कॉंग्रेस पक्षाकडून दिवाळखोरीचं राजकारण सुरू आहे. त्यांना विचार नाही. हा पक्ष अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यासमोर पूर्णपणे शरण गेला आहे.

 

प्रकाश आंबेडकर यांनी पुढे नमूद केले की, याआधीही मी म्हणालो होतो की राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडत असताना तो आदिवासी वर्गातला असला पाहिजे. माझी ही भूमिका मी विरोधी पक्षाला कळवली होती. एकीकडे हे स्वत:ला विचारांचे ठेकेदार समजतात. पण दुर्दैवाने ते अक्कलशून्य आहेत, असं आंबेडकर म्हणाले.

Protected Content