केरळमध्ये भूस्खलन; पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केरळमधील मुन्नार येथून २५ किमी अंतरावर झालेल्या भूस्खलनात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने बचावकार्यासाठी भारतीय हवाई दलाची मदत मागितली आहे.

 

एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, केरळमधील पर्यटन स्थळ असणाऱ्या येथून २५ किमी अंतरावर झालेल्या भूस्खलनात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या परिसरात ७० ते ८० लोक वास्तव्यास असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० जणांची सुखरुप सुटका कऱण्यात आल्याचे वृत्त आहे. अजून किती लोक अडकले आहेत याची माहिती सध्या प्रशासन घेत आहे. दरम्यान, सतत सुरु असलेल्या पावसामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी बचावकार्यासाठी भारतीय हवाई दलाची मदत मागितली आहे.

Protected Content