कृषी मंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त भागात पाहणी

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यभरात गारपिट व अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार जळगांव जिल्हा दौऱ्यावर असतांना एरंडोल तालुक्यातील नुकसानग्रस्त शेती पिकांची त्यांनी पाहणी केली.

यावेळी जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी बरेच शेतकरी पंचनाम्यापासुन वंचित आहेत तसेच गारपिट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावुन गेलेला आहे. हे नुकसान कुठेही एका विशिष्ट भागात नाही तर सर्वत्र आहे. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे व्हावेत व तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मंत्री महोदयांकडे केली.

याप्रसंगी मागणीची मंत्री अब्दुल सत्तार यांनी दखल घेत शासन अतितातडीची मदत जाहीर करण्यासाठी सकारात्मक असुन एकही शेतकरी पंचनाम्याशिवाय राहु नये, सर्वांचे सरसकट पंचनामे व्हावेत जेणेकरून एकही शेतकरी वंचित राहु नये असे, आदेश उपस्थित तहसिलदार व तालुका कृषि अधिकारी यांना दिले.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, मा.जि.प.सदस्य प्रताप पाटील, जिल्हाप्रमुख निलेश पाटील, धुळे जिल्हाप्रमुख सतिष महाले, तालुकाप्रमुख रवि जाधव, बबलु पाटील, अमळनेर तालुकाप्रमुख प्रथमेश पवार, शहरसंघटक मयुर महाजन, टोळी येथील बाळासाहेब पाटील, तहसिलदार सुचिता चव्हाण, तालुका कृषि अधिकारी शरद बोरसे यांचेसह शेतकरी उपस्थित होते.

Protected Content