किरकोळ कारणावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण !

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला तीन जणांनी बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना रविवारी २९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता तांबापुर परिसरातील नाथ गल्ली येथे घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आकाश प्रकाश चव्हाण रा. डी-मार्ट जवळ, तांबापूरा, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी २९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून आकाश चव्हाण याला अरबाज तडवी, अमन अरबाज तडवी आणि युनूस अरबाज तडवी तिघे रा. तांबापुरा जळगाव यांनी नाथ गल्लीत हातातील कडे आकाशला मारून दुखापत केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर आकाशचा भाऊ रवी प्रकाश चव्हाण याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अरबाज तडवी, अमन अरबाज तडवी आणि युनूस अरबाज तडवी या तिघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन पाटील करीत आहे.

Protected Content