किरकोळ कारणावरून कुटूंबातील तिघांना बेदम मारहाण

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील गोद्री येथे गटारीवर धापा बांधण्याच्या कारणावरून तरुणासह घरातील इतर दोघांना लोखंडी आसारीने मारहाण करून गंभीर दुखापत केली. या घटनेबाबत गुरूवार २ मार्च रोजी रात्री १० वाजता पहूर पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अशोक विजयसिंह नाईक (वय-३०) रा. गोद्री ता. जामनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता अशोक नाईक हे घरी असताना त्यांच्या घरासमोर गटारीचेवरील धापा बांधण्याचा कारणावरून वाद झाला. यामध्ये अनिल कोंडू नाईक, सुनील कोंडू नाईक, कोंडू वसंतदास नाईक, रेखाबाई कोंडू नाईक, रंजना सुनील नाईक आणि रोशनी अनिल नाईक सर्व राहणार गोदरी तालुका जामनेर यांनी लोखंडी असावी घेऊन अशोक नाईक व त्यांच्या घरातील विजय नाईक, ईश्वर नाईक यांना बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर अशोक नाईक यांनी गुरुवार २ मार्च रोजी रात्री १० वाजता पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण शिंपी करीत आहे.

Protected Content