किनगाव ग्रामपंचायतच्या मावळत्या कार्यकारी मंडळाचा सत्कार

चोपडा, प्रतिनिधी । कर्मचाऱ्यांना न्याय देऊन किनगाव ग्रामपंचायतीने पंचायत राज्याच्या स्थापनेमागील उद्देश तडीस नेल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे सचिव कॉम्रेड यांच्यातर्फे यावल तालुक्यातील किनगाव येथे मावळत्या ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाचा सत्कार करण्यात आला.

किनगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे पगार तीन हजार रुपयेवरुन ९५०० ते ११००० पर्यंत वाढवणेत आले. म्हणजे कर्मचाऱ्यांचे पगारात २ हजार ते ६हजार रुपयाची वाढ केली. ही वाढ जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जीवनातील अत्यंत मोलाची असून यामुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमान निश्चित चर्चा उंचावणार आहे. पंचायत राज आणण्यामागील उद्देश खऱ्या अर्थाने कर्मचाऱ्यांना न्याय देऊन किनगाव बु पंचायतीने तडीस नेला आहे असे प्रतिपादन केले. ते ग्रामपंचायत कर्मचारी किनगाव येथे आयोजित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व पदाधिकारी यांच्या सत्कार व निरोप प्रसंगी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की ग्रामपंचायतील कर्मचारी सर्व संबंधित कामे इमानेइतबारे करत आहेत व करतील अशी ग्वाही देऊन मावळत्या कार्यकारी मंडळास निरोप देताना काॅम्रेड महाजन यांनी पुढील कालावधीत आपण निवडून यावेत अशी सदिच्छा दिली. ग्रामपंचायत कर्मचारी महासंघातर्फे सरपंच टिकाराम चौधरी, उपसरपंच लतिफ तडवी, सभासद व ग्राम विकास अधिकारी प्रदीप धनगर यांनी त्यांच्या कार्यकाळाचा शेवटच्या कालावधीत गावातील १५ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार किमान वेतन कायद्याप्रमाणे व राहणीमान भत्ता चार हजार रुपये पन्नास रुपये लावून वाढ केली.

कर्मचाऱ्यांचे १९९९ पासून जे कपात प्रोविडंट फंड बँक खाते भरणा न झाल्याने प्रलंबित भरणा करण्याची ग्वाही दिली. कर्मचाऱ्यांनी यांच्या सत्कार बरोबर निरोप समारंभाचा कार्यक्रम किनगाव ग्रामपंचायत सभागृहात आयोजित केला होता. त्यावेळी गावातील जेष्ठ कम्युनिस्ट कार्यकर्ते एकनाथ महाजन यांचाही शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे तालुकाध्यक्ष कॉम्रेड किशोर कंडारे हे होते.

या सर्व मान्यवरांचा सत्कार महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे सचिव कॉम्रेड अमृत महाजन यांनी व सहकाऱ्यांनी केला. यावेळी सूत्रसंचालन प्रदिप जोशी यांनी केले . संचालक कार्यकारी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करताना ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रदीप धनगर म्हणाले की, किनगाव ग्रामस्थांकडे तीन कोटी रुपये कर थकबाकी असून वसुलीसाठी ग्रामस्थांचा प्रतिसाद वाखाणण्याजोगा आहे.

विशेष कोरोना महामारी असतांनाच! प्रतिसाद .असाच राहिला तर गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही दिली किशोर कंडारे यांनी अध्यक्षीय भाषणात त्यांच्या कर्मचारी पदाच्या काळात माजी सरपंच कै शामराव कोळी, महमूद बोंदर व ग्राम विकास अधिकारी नाले यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला व आभार मानले.

यशस्वीतेसाठी शिपाई छगन साळुंखे, संदीप राजू पाटील, सुरेश साळुंखे, नाना पाटील, जगदीश कंडारे, गौतम कंडारे संदीप रोहिदास पाटील, डाटा ऑपरेटर सुजाता डाके ,बेबाबाई कंडारे, शांताबाई कंडारे, रंजीता रल, ज्योती जावा, राजू जावा , आरती कंडारे, बेबाबाई कंडारे दिनकर सुतार निलेश धांडे सर्व कर्मचारी तसेच अकुल खेडे येथील प्रकाश रल सुमनबाई रल उपस्थित होते.

Protected Content