काँग्रेस सरकारकडून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला : सचिन पायलट

जयपूर (वृत्तसंस्था) अधिकाऱ्यांना आपले आदेश न मानण्यास सांगण्यात आले होते. तसेच आपला आवाज दाबण्याचा काँग्रेस सरकारकडून प्रयत्न करण्यात आला, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री आणि माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी गहलोत सरकारवर केला आहे.

 

 

राजस्थानातील राजकारणात आलेल्या भूकंपानंतर माजी मुख्यमंत्री आणि माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी ‘इंडिया टुडे’ ग्रुपला दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. पायलट पुढे म्हणाले की, गहलोत यांच्यावर नाराज नाही. सोबतच आपण गहलोत यांच्याकडे काही खास ताकद मागितली नव्हती, असा खुलासाही त्यांनी केला. राजस्थान सरकारनं निवडणुकीत जी आश्वासनं दिली होती, ती पूर्ण करण्यात यावीत अशी माझी इच्छा होती. आम्ही वसुंधरा राजे सरकारच्या अवैध खाणींविरोधात आंदोलन केले होते. परंतु, सत्तेत आल्यानंतर गहलोतही यांनीही त्याच मार्गावर पाऊल ठेवले. आपल्या समर्थकांना योग्य तो सन्मान दिला जात नव्हता, असा आरोपही पायलट यांनी या मुलाखतीत केला आहे.

Protected Content