कसाबला मारण्याची सुपारी दाऊदने घेतली होती : राकेश मारिया

rakesh mariya

 

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईवरील हल्ल्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कसाबला मारण्याची सुपारी देण्यात आली होती, असा खळबळजनक गोप्यस्फोट राकेश मारिया यांनी त्यांच्या ‘लेट मी से इट नाऊ’ या आत्मचरित्रात केला आहे.

 

राकेश मारिया यांनी त्यांच्या या पुस्तकात अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. पोलिसांना दहशतवादी अजमल कसाबचा फोटो जारी करायचा नव्हता.अतिरेक्यांची डिटेल मीडियात लीक होऊ नये याचा आमचा पूर्ण प्रयत्न होता. कसाबच्या विरोधात जनतेसह मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड संताप होता. त्यामुळे देशाचा दुश्मन असलेल्या कसाबला जीवंत ठेवणे हे माझे प्राधान्य होते. कसाब हा मुंबईवरील हल्ल्याचा एकमेव जीवंत साक्षीदार असल्याने जगभर नाचक्की होऊ नये म्हणून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांना कसाबला संपवायचे होते. त्यामुळेच कसाबला संपवण्यासाठी दाऊदला सुपारी देण्यात आली होती, असा दावा या पुस्तकात मारिया यांनी केला आहे. मुंबईवरील हल्ला हा हिंदू दहशतवाद्यांनीच घडवून आणल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न आयएसआयने केला होता. हे दहाही हल्लेखोर हिंदू असल्याचे भासवण्यासाठी त्यांच्यासोबत बनावट ओळखपत्रंही पाठवण्यात आले होते. त्यातील एका ओळखपत्रावर समीर चौधरी असे लिहिलेले होते, असा दावाही त्यांनी केला आहे.

Protected Content