उद्धव ठाकरे डमी ; खरा मुख्यमंत्री दाऊद !

लखनऊ वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशमधील भाजपाचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. आपल्याला डी कंपनीद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. त्यांनी महाराष्ट्र सरकारवरही गंभीर आरोप करत सरकार डी कंपनीच्या इशाऱ्यावर चालत असल्याचं म्हटलं. ते सरकार तात्काळ बरखास्त करून राष्ट्रपती शासन लावण्याची मागणीही त्यांनी केली.

पाकिस्तानला क्लिन चीट देणाऱ्या अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या पाताल लोक या वेब सीरिजला विरोध केल्यानंतर आपल्याला इस्लामाबादशिवाय अन्य इस्लामिक देशांमधून धमकी मिळत असल्याचंही ते म्हणाले.

. महाराष्ट्रात महाविनाश आघाडीचं सरकार सत्तेवर आलं आहे. तेव्हापासून महाराष्ट्र गुन्हे आणि ड्रग्जमध्ये आला आहे. उद्धव ठाकरे एक डमी मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. परंतु खरा मुख्यमंत्री तर दाऊद इब्राहिम आहे. याची पडताळणी करण्यासाठी आवश्यकता असल्यास लोकांचे कॉल डिटेल्स काढण्यात यावे,” असंही गुर्जर म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अटकेची मागणीही केली. तसंच कंगना रणौतला बॉलिवूड माफियांकडून जिवाचा धोका असल्यामुळे तिच्यासाठी झेड प्लस सुरक्षा उपलब्ध करून द्यावी अस गुर्जर यांनी नमूद केलं.

Protected Content