ईश्वर चोरडिया सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

 

पाचोरा, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पाळधी गावातील ईश्वर चोरडिया यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना सुलक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह शासकीय रुग्णालय घाटी, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने तर्फे सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.

सुलक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह शासकीय रुग्णालय घाटी यांच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५१ लोकांना सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान करण्यासाठी उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला होता. याप्रसंगी विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे डॉ. सागर गरुड, पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस, घनश्याम सोनवणे, विश्वास पाटील, नालंदा लांडगे, गोपल बोचरे, ईश्वर चोरडिया, डॉ. जितेंद्र वानखेडे, आण्णा सुरवाडे, नामदेव खराडे, डॉ. सायली तावडे, डॉ. सुरेश जगंले, हबिब पठाण, विशाल जैन, भरत कल्याणकर, सचिन कर्नावट, मनोज पवार, लक्ष्मण बोर्डे, रविंद्र साळवें, आनंदा माहोर, डॉ. देवानंद सरताळे, टी.आर. पाटील, मुरलीधर जाधव, सत्यवान रोडे, अनिस बेग, अजंली चिंचोलकर, कपील निलवर्ण, दिनेश चौधरी, संजय बालगुडे, चेतन पाटील, मोनिका शिंपी, जय उपासे, राहुल हाकाळे, प्रशांत गायकवाड, कृष्णा वाघ, कैलाश शर्मा विशाल बींदवाल, विना पाटणी, लता जाधव आम्रपाली त्रिभुवन, संजय बाविस्कर, किरन बोर्डे यांना सेवा गौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच विशेष सत्कारमूर्ती माणुसकी ग्रुप (सिल्लोड) कचरु सुरडकर, माणुसकी ग्रुप (पाळधी) माणुसकी ग्रुप (लोहारा), माणुसकी ग्रुप (शेंदुर्णी, कळमसरा), माणुसकी ग्रुप औरंगाबाद, सय्यद साबेर, रामेश्वर दरेकर, जावेद खान, शेख जावेद पटेल, हणुमान रुळे, हसन शहा, राजश्री चौधरी, अनिस रामपुरे, चंद्रकांत गीते (सेंट्रल पोलिस), कवी मंगलदास मोरे, प्रकाश मोतीहार, बापू विनायक पाटील, दत्तात्रय तेली, आदिंचा सत्कार करन्यात आला आला. या कार्यक्रमास गजानन पिंपळे, संतोष हिरे, सिताराम वाणी, चंद्रकांत गीते, गोपाल वाणी, अनिस रामपुरे, मगंलदास मोरे, योगेश साहिते, पुजा पंडित, देविदास पंडित, मिराबाई पंडित, परमेश्वर कांबळे, कल्पेश पंडित, विनोद पंडित, ऋषिकेश अपार, विनायक ढवळे, विष्णू बोर्डे, गजानन क्षीरसागर, गजानन वाणी, नाना माळी, सहकार्य केले. यावेळी सूत्रसंचालन अंजली चिंचोलेकर यांनी तर आभार समाजसेवक सुमित पंडित यांनी मानले.

Protected Content