आ. राजूमामा मोठया मनाचे : ‘त्या’ पुलांचे काम स्वखर्चाने करावे : गटनेते अनंत जोशी (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । ठेकेदाराला अडचणीत न आणता नवीन निविदा प्रक्रिया न करता मोठे मन ठेऊन आ. राजूमामा भोळे यांनी अयोध्या नगर परिसरातील ‘रामनगर ते लक्ष्मीनगर’ पुलाचे राहिलेले थोडे काम स्वखर्चाने करून लोकार्पण लवकरच करावे आणि जनतेला न्याय द्यावा असे मत मनपाचे शिवसेना गटनेते अनंत जोशी यांनी व्यक्त केले आहे.

आधीच ‘त्या’ पुलाचे बांधकाम झालेले आहे असे असतांना निविदा प्रक्रिया व कागदीघोडे नाचविणे कितपत योग्य आहे असा सवाल नगरसेवक जोशी यांनी उपस्थित करून आ. राजू मामा हे मोठ्या मनाचे आहे, त्यांनी नेहमीच सहकार्याची भावना दाखवली आहे. पुलाचे कामी ठेकेदाराचे पैसे अडकले आहेत तो अडचणीत येऊ नये असे वाटते पुलाचे काम अगदी थोडे बाकी आहे ते आता आ. भोळे यांनी स्वखर्चातूनच पूर्ण करावे आणि लोकार्पण सोहळ्याचे लवकरच डिजिटल बॅनर झळकावे, त्या समारंभाला सर्व पक्षीय नेत्यांना बोलवावे आणि होणार जनक्षोभ थांबवावा असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादीचं अर्बन सेल च्या जिल्हा अध्यक्षा व माजी नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी आधीच बांधकामं झालेल्या पुलाच्या बांधकामाची बेकायदेशीर निविदा काढून आमदार निधी हडप जाण्यासाठी होत असलेल्या भ्राट्राचाराबाबत आवाज उठविला आहे. सध्या ‘रामनगर ते लक्ष्मीनगर’ पुलाच्या आरोप प्रत्यारोपाच्या फ़ैरी रंगल्या आहेत.

https://www.facebook.com/watch/?v=270186967530087

Protected Content