आम्ही ‘सुरत टू गुवाहाटी’ ५० थर रचले होते ! : एकनाथ शिंदे

मुंबई -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज दहीहंडीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील टेंभी नाका परिसरात आज दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी बोलतांना त्यांनी उध्दव ठाकरे यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, ”तुम्ही दहीहंडी फोडताय. आम्ही दीड महिन्यापूर्वी सर्वात मोठी हंडी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं फोडली. आम्ही ५० थर लावले होते. सूरत टू गुवाहाटी !” अशा शब्दात त्यांनी टीका केली.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, मागचे दोन वर्ष निर्बंधात जगलो. आता सगळं सुरळीत झालं आहे. तसेच, ठाण्याचा मुख्यमंत्री व्हावी हा धर्मवीर आनंद दिघे यांची इच्छा असल्याचे त्यांच्या भगिनींनी आपल्याला सांगितले होते अशी आठवण देखील त्यांनी याप्रसंगी सांगितली. तर लवकरच ‘प्रो दहीहंडी’ स्पर्धा आयोजीत करण्यात येणार असून खेळाडूंना नोकरीत ५ टक्के आरक्षण मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Protected Content