आमच्यावरही राजद्रोह लावा : देवेद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राणा दाम्पत्याला राजद्रोहाचे कलम लावून १४ दिवसांची कोठडी सुनाविण्यात आल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत हनुमान चालीसा म्हणणे राजद्रोह असेल तर मी मुख्यमंत्र्यांना सांगेन आम्ही तो रोज करू. आमच्यावरही लावा राजद्रोह असे आव्हान त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रकार परिषदेत दिले आहे.

 

हनुमान चालीसा म्हणण्याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतलेल्या खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या विरोधात राजद्रोहाचे कलम लावून त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सूनावण्यात आली आहे. त्यानंतर राणा दाम्पत्याची बाजू घेत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारवर ताशेरे ओढले. हनुमान चालीसा आपल्या देशात म्हणायची नाही तर मग काय पाकिस्तानात जावून म्हणायची का ? असा प्रश्नही देवेद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत अतिशय स्पष्ट शब्दोच्चारात हनुमान चालीसा पठणास सुरवात केली. फक्त राणा दाम्पत्यच नाही तर आम्ही प्रत्येक जण रोज हनुमान चालीसा म्हणू आमच्यावर किती गुन्हे दाखल करायचे ते करा, असा इशारशी फडणवीस यांनी दिला.

Protected Content