आपसात हाणामारी करणाऱ्या तिघांना अटक

जळगाव प्रतिनिधी ।  तुकारामवाडीत जुन्या वादातून आपसात हाणामारी करणार्‍या तीन जणांना एमआईडीसी पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक अल्पवयीन मुलाचा सामावेश आहे.

भूषण विजय माळी (19), दत्तू उर्फ गोलु नारायण चौधरी (27), आकाश रवींद्र मराठे व एक अल्पवयीन मुलागा असे तिघांची नवे आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजता हा वाद झाला.

पोलिसांनी अटक केलेल्या या तिघांजवळून सुरा, लोखंडी आसारी व लाकडी दांडा हस्तगत करण्यात आला आहे. त्यामुळे हाणामारीसाठी त्यांनी ही साहित्य बागळल्याची माहिती आहे. मात्र अनुचित घटना घडल्यापूर्वी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. या चौघांनी जमावबंदी आदेशाचेही उल्लंघन केले. त्यांच्याविरुध्द कलम 160 व आर्मअ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचारी गोविंदा विश्राम पाटील यांनी फिर्याद दिली. सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, इम्रान सय्यद, मुदस्सर काझी, सचिन पाटील व असीम तडवी यांनी घटनास्थळावर धाव घेऊन वाद सोडविला व चौघांना ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलाला समज देवून सोडून देण्यात आले आहे.

Protected Content