अशी हलकट, नीच आणि संकुचित बुद्धी फडणवीसांचीच असू शकते ; अनिल गोटेंची जहरी टीका

 

धुळे (प्रतिनिधी) स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबातील कुणीही राजकारणात राहू नये, अशी हलकट, नीच आणि संकुचित बुद्धी फडणवीसांचीच असू शकते, अशी जहरी टीका राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. गोटे यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचाही चांगलाच समाचार घेतला आहे. एवढेच नव्हे तर, खडसेंविरुद्ध षडयंत्र देखील फडणवीसांनीच रचल्याचा आरोपही गोटे यांनी केला आहे.

 

गोटे आपल्या पत्रकात म्हणतात, मुनवादी मनोवृत्तीचा मी प्रत्यक्ष बळी आहे. कुत्सीत विचारांच्या, हलकट मनोवृत्तीचे, लबाडी व खोटे बोलण्याचे एकत्रित रुप म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. ते हलक्या कानाचे कारस्थानी आहेत की, शकुनी मामा देखील झक मारेल. प्रारंभीच्या काळात एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध कारस्थान यांनीच रचले. खडसे दाऊदच्या बायकोसोबत फोनवर बोलतात इथपासून सुरु झालेले आरोप त्यांच्या कुटुंबापर्यंत जाऊन पोहोचले. नाथाभाऊंची चूक एवढीच की त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. पडळकरांनी शरद पवारांना कोरोनाची उपमा दिली. यावरुन त्यांची राजकीय पात्रता, मनाची क्षुद्रता आणि विचारांची पातळी लक्षात येते. पवारांचे वय, अनुभव अन् राजकीय कारकीर्द पाहता पडळकर हे डासाएवढेही नाहीत. डास मारायला कुणी बंदूक वापरत नाही. त्याला हीटचा फवारा पुरेसा असतो, असे गोटे यांनी म्हटले आहे. आमदार होऊन आठ दिवस झालेत, तोवर पडळकरांना नशा चढली आहे. भारतीय जनता पार्टी आणि पक्षातील उच्चवर्णियांच्या संकुचिपणाची त्यांना अजून पुसटशी ओळखही नाही, असेही गोटे यांनी म्हटले आहे.

Protected Content