अंगणवाडीच्या नळजोडण्या लवकर करा ; दिव्या भोसले यांचे निवेदन

 

जळगाव : प्रतिनिधी । जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या माध्यमातून अंगणवाड्याना नळजोडणी लवकर करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आज राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले

 

जिल्हात 1 हजार कुपोषित बालकांची आकडेवारी समोर आल्याने पालकवर्गात भितीचे वातावरण आहे ३४६० अंगणवाड्यापैकी अद्याप १६३२ अंगणवाड्यामध्ये जोडणी झालेली नाही स्वच्छतागृहाचा अभाव असल्याचे समोर आल्याने अंगणवाडीच्या बाबतीत अनेक समस्या भेडसावत असल्याचे चिञ आहे शुन्य ते सहा वयोगटातील बालकं , स्तनदा माता,  गरोदर माता , किशोरवयीन मुली यांच्यासाठी  उपक्रम राबविले जातात  शिक्षण ते आरोग्यवर्धन, मार्गदर्शन ते सुपोषण यावर भर दिला जातो यासाठी अंगणवाडी व  मिनी अंगणवाडी कार्यान्वित असून त्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत बालक , माता, मुली यांच्यासाठी महत्वाच्या असलेल्या या अंगणवाड्या गावातील मोकळया जागेत विरळ वस्ती भागासह वाडी,  वस्तीवर ,पाड्यावर आहेत  दुर्गम भागातील अंगनवाडीत पिण्याच्या पाण्याची सुविधा किंवा सांडपाण्याची सोय उपल्बध नसते पोषण आहार घेतला तर पाणी प्यायचे कुठले असा प्रश्न आहे

 

केंद्राच्या जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक अंगणावाडीत पाण्याची मोहीम शासनाने हाती घेतली जिल्हातील सर्व अंगणवाडीना जलजीवन मिशन अंतर्गत शाश्वत पाणी पुरवठा उपल्बध करून देऊन लवकर नळजोडणी करण्यात यावी  म्हणून  जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी यांना प्रदेश राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी निवेदन दिले .  मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले

 

Protected Content