किनगाव येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील २७ वर्षीय तरूणाने प्रेमभंग झाल्याच्या कारणावरून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील किनगाव येथील राजू महाजन हे पत्नी व दोन मुले आणि सुन असे वास्तव्याला आहे. शेतीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बुधवार २२ डिसेंबर रोजी सकाळी राजू पाटील हे पत्नी व लहान मुलगा योगेश आणि सुन असे शेतात कामासाठी निघून गेले. त्यावेळी त्यांचा मोठा अविवाहित मुलगा समाधान राजू महाजन (वय-२७) हा घरी एकटाच होता. घरी कुणीही नसतांना समाधान याने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.

सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शेतातून राजू महाजन आणि कुटुंबिय घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून आईवडीलांनी हंबरडा फोडला. मयत समाधान याने भिंतीवर सुसाईन नोट लिहीली होती. त्यात त्याने म्हटले आहे की, आपला प्रेमभंग झाला असून यावल पोलीसांनी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात रवाना करण्यात आला. याप्रकरणी रात्री ८ वाजता यावल पोलीसात योगेश महाजन याच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार नरेंद्र बागुले करीत आहे. त्याच्या पश्चात आई-वडील लहान भाऊ असा परिवार आहे.

Protected Content