मंगेश चव्हाण यांनी जाणून घेतल्या वीज ग्राहकांच्या अडचणी

vij grahak uposhan

 

चाळीसगाव, प्रतिनिधी | वीज वितरण कंपनीच्या वतीने शहरात रेडीओ फ्रिक्वेंसी वीज मिटर बसवण्यात येत आहेत. या मिटरमुळे सर्वसामान्य जनतेला दुप्पट-तिप्पट वीज बिल येत आहे, त्यासाठी हे मिटर बसवणे बंद करावे, यासाठी रयत सेना व युनिटी क्लबने कालपासून (दि.६) बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. आज (दि.७) येथील युवा नेते मंगेशदादा चव्हाण यांनी आंदोलन स्थळी भेट देवून चर्चा केली, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांना आपला पाठींबा दर्शवला.

 

यावेळी आंदोलनकर्त्यांनी त्यांना सांगितलेल्या समस्यांवर आपल्यावतीने शक्य ती सगळी मदत देवून, ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मंगेशदादांनी यावेळी दिले. त्यांच्या भेटीने आंदोलनकर्त्यांना मोठा आधार वाटला. त्यांनी या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले.

Protected Content