मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य मंत्रीमंडळाचा रखडलेला विस्तार आणि नागरिकांच्या कामांच्या खोळंब्यावरून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. यात म्हटले आहे की, बंड झाले, आता थंड झाले ? पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्ह्याला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत, मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झालंय, सर्वकाही ठप्प आहे. तुमचं सर्व ओक्के आहे हो, पण लोकांचे सण आलेत. रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी, रोगराई वाढत आहे. याकडे कोण बघेल?, असं म्हणत राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.
राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टातील सुनावणी ही सातत्याने पुढे ढकलली जात असून याचमुळे मंत्रीमंडळाच्या विस्ताराचे गाडे देखी अडकले आहे. यामुळे राज्य सरकारवर टीका होतांना दिसून येत आहे. यात आज मनसेच्या एकमेव आमदारांनीही सरकारवर निशाणा साधल्याचे दिसून येत आहे.