यावल नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत पाण्याच्या प्रश्नावरून गदारोळ (व्हिडीओ)

yawal nagar parishad

यावल, प्रतिनिधी । येथील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रात नागरीकांना सार्वजनीक नळांना सोडण्यात येणाऱ्या पाण्याची वेळ तीन दिवसावर न सोडता दोन दिवसावर करण्यात यावा, या पाण्याच्या प्रश्नावरून सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ व शाब्दिक चकमक उडाली.

याबाबत माहिती अशी की, यावल नगर परिषदेची मासिक सर्वसाधारण सभा आज दिनांक २० रोजी सकाळी १० वाजता आयोजीत करण्यात आली होती. या सभेत माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी सभेत आयत्या वेळेस शहरातील नागरीकांना पिण्याचे मुबलक पाणी मिळत नसल्याची ओरड असुन, यासंदर्भात पाटील यांनी सांगीतले की, यावल शहरातील नागरीकांना मागील 6 महीन्यांपासुन पाण्याच्या तिव्र टंचाईचा सामना करावा लागला तरी देखील जनतेने संकटात देखील नगर परिषदला सहकार्य केले असुन, यंदा आपल्या परिसरात सर्वत्र चांगला पाऊस झाला असल्याने येणाऱ्या पुढील एक वर्षा पर्यंत पुरेल इतका पुरेसा मुबलक जलसाठा असतांना नगरपरिषदेने शहरात होणारा तिन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा हा दोन दिवसाचा करावा, अशी मागणी केली. यावर शिवसेने माजी नगराध्यक्ष व नगरसेवक दिपक रामचंद्र बेहडे यांनी या विषयाला विरोध करून उलट नागरीकांकडुन पाण्याची नासाडी करण्यात येते. काही लोकांच्या नळांना तोटयाच नसतात त्यामुळे मोठया प्रमाणे पाण्याची नासाडी होत असत, असे बोलुन पाटील यांच्या मागणीला विरोध दर्शविला. या विषयाला घेवुन पाटील यांनी सांगीतले की शहरात नळांना 10 टक्के नागरीक हे तोटया बसवत नाही. म्हणुन ९० टक्के लोकांना त्याचा भुर्दंड द्यावा हे चुकी आहे अशी आपली भुमिका मांडल्याने दोघ माजी नगराध्यक्षामध्ये शाब्दीक चकमक उडाली. या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष सुरेखा कोळी, मुख्याधिकारी बबन तडवी, नगरसेवक प्रा. मुकेश येवले, असलम शेख नबी, सामिर शेख मोमीन, आभिमन्यु चौधरी, नगरसेविका सौ. कल्पना वाणी, सौ. देवयानी महाजन, रुख्मणी भालेराव, शिला सोनवणे आदी उपस्थित होते.

Protected Content