समता नगर येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेला तिघांकडून मारहाण

जळगाव प्रतिनिधी । पोलीसात दाखल केस मागे घेत नसल्याच्या कारणावरून महिलेला तीन जणांनी शिवीगाळ केल्याची घटना सोमवार ५ एप्रिल रोजी सायंकाळी समता नगरात घडली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून तीन जणांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, मंगला मोतीलाल शिंदे (वय-५६) रा. धामनगाव वाडा, समता नगर ह्या आपल्या कुटुंबियांसह राहतात. जुन्या भांडणाच्या कारणावरून संशयित आरोपी कांतीलाल मोहन पवार, नितीन भगवान सपकाळे आणि भगवान सपकाळे तिघे रा. समता नगर यांच्याविरूध्द महिलेने रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मागील भांडणाच्या रागातून तिघांनी ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास महिलेच्या घरासमोर येवून अश्लिल शिवीगाळ करून दमदाटी केली. महिलेच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सतीश डोलारे करीत आहे. 

Protected Content