सर्वच अडाणींच्या घशात घालणार का ? : उध्दव ठाकरेंचा घणाघात

मुंबई-वृत्तसेवा | भाजप सरकारने आता सर्वच काही अडाणींच्या घशात घालणे सुरू केले असून आपण याला प्रतिकार करणार आहोत असा घणाघाती हल्ला उध्दव ठाकरे यांनी केला. ते आज धारावीपासून अडाणी यांच्या कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाला संबोधीत करत होते.

शिवसेना-उध्दव बाळासाहेब पक्षातर्फे आज अडाणी यांच्या घरावर विशाल मोर्चा काढण्यात आला. दुपारी धारावीपासून सुरू झालेला मोर्चा सायंकाळी अडाणी यांच्या कार्यालयाच्या समोर आला. येथे या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. याला उध्दव ठाकरे यांनी संबोधित करतांना पंतप्रधान मोदी आणि अडाणी यांच्या संबंधांसह भाजपवर देखील जोरदार टिका केली.

याप्रसंगी उध्दव ठाकरे म्हणाले की, धारावी अडानीकडे देण्यात आले असून आता गोवंडीही देणार आहे.  कॉंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते ये सूटबुट की सरकार आहे. सूट त्यांना बूट आम्हाला. आमचं सरकार आलं तर बूट काय असतो हे आम्ही दाखवतो. धारावीत बुट बनतात. पापडं बनतात, लोणची बनतात. जास्त नादी लागला तर पापडासारखं लोळून टाकू, अशी टिका ठाकरे यांनी केली.

याप्रसंगी उध्दव ठाकरे पुढे म्हणाले की, धारावीच्या विकासाला आमचा आजिबात विरोध नाही, पण धारावीत राहणार्‍या प्रत्येकाला ५०० स्क्वेअर फुटांचं घर मिळावं, बाकी काही कारणं चालणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला. धारावीकरांना जिथल्या तिथे घर द्या, व्यवसायाला जागा द्या, धारावीतील कोळीवाडा आणि कुंभारवाड्याला वेगळी जागा द्या, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी याप्रसंगी दिला.

Protected Content