
धरणगाव (प्रतिनिधी) वाढते तापमान आणि धरणागावची भिषण पाणी टंचाई सध्या मोठी चिंतेची बाब आहे. या समस्यांची दाहकता कमी करण्यासाठी पावसाळ्या अगोदर गावात काही ठोस काम करावे, या हेतूने काही माजी विद्यार्थ्यानी एकत्र आले आहेत. त्यानुसार आगामी काही दिवसात जलदूत फाऊंडेशनच्या माध्यमातून धरणगावात जलसंधारण व वृक्षसंवर्धनाची कामे होणार आहेत.
शहरातील प. रा. विद्यालय व बालकवी ठोंबरे शालेत सन २०००-०१ साली १० वीत शिकलेल्या आणि २०१३ पासून Whatsapp च्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असलेल्या धरणगावातील तसेच धरणगावाच्या बाहेर राहणाऱ्या काही तरुणांनी एकत्र येवून जलदूत फाऊंडेशन स्थापन केले आहे. जलदूत फाऊंडेशनच्या माध्यमातून धरणगावात जलसंधारण व वृक्षसंवर्धनाची कामे करायाचे नियोजन तयार करण्यात आले आहे. तरी एक धरणगावकर म्हणुन या कार्यात मदत करायची किंवा कोणते काम करू शकतो?, हे सुचवायचे असल्यास डॉ. पंकज अमृतकर 9503474403,सुनिल शहा 9960756787,योगेश भाटीया 9420112473,नितेश माळी 9158468184,अमोल पाटील ( PSI ) 9422644527,डॉ. आशिष सूर्यवंशी 9890454010,स्वप्नील मालपुरे 9096107372,उदय डहाळे 7738300289,दिनेश मोहकर 9890529105,हेमंत लोहार 9881053143,सागर कर्वा 9823882888,स्वप्नील जोशी 9423773124,उल्हास पाटील 9421621965,विशाल लांबोळे 9422775065,धवल जैन +16179223697, विक्रांत पाटील 8830465933 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.