जळगाव राहूल शिरसाळे । उत्तर प्रदेशातील शिया वक्फ बोर्डचे माजी अध्यक्ष वसीम रिजवी यांनी सर्वोच्च न्यायालयात पवित्र कुराणातील २६ श्लोक वगळण्यासाठी जनहित याचिका दाखल केली. याच्या निषेधार्थ आज जळगाव येथे टॉवर चौकात अल्पसंख्याक सेवा संघटनेतर्फे वसीमवर गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
कुरान, मस्जिद असो किंवा कोणताही धर्मग्रंथ असो यावर संशोधन किंवा कोर्ट अधिकार क्षेत्रात कोणताही धर्मग्रंथ येत नाही. अशा या वसीम रिजवीला कोर्टाने कडक शासन करावे व कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखवल्या जावू नये व अशा व्यक्तींमुळे संपूर्ण देश बदनाम होत असल्याने याचा निषेध व्यक्त करण्यात आला तसेच वसीम रिजवी या मुस्लीम समाज विरोधक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मग्न अल्पसंख्याक सेवा संघातर्फे जोडो मारो आंदोलन प्रसंगी करण्यात आली. यावेळी अल्पसंख्याक सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष जहांगीर ए. खान, गुलाम मिर्झा, शहर अध्यक्ष सिद्दिक कादर मणियार, तन्वीर शेख उपस्थित होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/188146556148891