विधेयकावरून काँग्रेस आगीत तेल ओतण्याचे काम करतेय – पंतप्रधान मोदींचा आरोप

prime minister narendra modi in mandsaur 3ad53cac f059 11e8 86fe bb1c4000c468

धनबाद वृत्तसंस्था । नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावराला होणारा विरोध अधिक तीव्र होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि मित्रपक्षांवर जोरदार हल्ला चढविला आहे. ‘काँग्रेस पक्षाने नेहमीच शरणार्थींचा वापर केला आहे आणि आता या विधेयकावरून ते ईशान्य भारतामध्ये आगीत तेल ओतण्याचे काम करीत आहेत,’ असा थेट आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील धनबाद येथील निवडणूक सभेत बोलताना केला.

ईशान्येकडील लोकांना खात्री देतो की त्यांनी कोणाकडूनही फसवण्याची गरज नाही,’ असे पंतप्रधान म्हणाले. ईशान्य भारतीय समाजाची संस्कृती, भाषा, मूल्ये, सन्मान अधिक समृद्ध करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मोदी काँग्रेसवर हल्लाबोल करताना म्हणाले, ‘काँग्रेसचे धोरण कायम स्वार्थाचे आहे. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक निर्वासिताला आम्ही नागरिकत्व देऊ असे काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी आश्वासने दिल; पण, काय झाले? आता ते पुन्हा मागे हटले आहेत. असे असले तरी शोषित लोकांना त्यांचे हक्क मिळण्याची गरज आहे. शेजारच्या देशांमध्ये अल्पसंख्याकांचा छळ झाला. अनेक शतकांपासून लक्षावधी अल्पसंख्यांकांचे शोषण होत आहे. जर त्यांना मानवी दृष्टीकोनातून आम्ही नागरिकत्व द्यायला निघालो असताना यालाही काँग्रेस विरोध करीत आहे.’

‘काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष ईशान्य भागातही आग लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता बांगलादेशातून मोठ्या संख्येने लोक येतील असा संभ्रम निर्माण केला जात आहे. हा कायदा आधीपासूनच भारतात आलेल्या शरणार्थींच्या नागरिकत्वासाठी आहे. ईशान्येकडील बहुतेक सर्व राज्ये या कायद्याच्या कक्षेच्या बाहेर आहेत,’ असे मोदी म्हणाले.

Protected Content