उद्धव ठाकरे रस्त्यावर या आणि मोर्चा काढा ! – सोमय्या

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे मंत्री मलिक यांचा आर्थिक गैरव्यवहार ‘मनी लॉण्ड्रींग’ प्रकरणात सहभाग असल्याचे न्यायालयाने मत नोंदवले आहे.  यावरून उद्धव ठाकरे साहेब, आता शरद पवारांसमवेत न्यायालयाविरुद्ध या रस्त्यावर आणि मोर्चा काढा, असे म्हणत भाजपचे किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि बिनखात्याचे मंत्री मलिक गोवावाला कंपाऊंडच्या वादग्रस्त जमीन बळकावून आर्थिक व्यवहार केल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळे मलिक यांच्या अडचणीत भर पडली आहे.

मलिक यांना इडीने मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटक केल्यानंतर उद्धव ठाकरेंपासून सर्व मंत्रिमंडळच मलिकांसाठी मैदानात उतरले होते. आणि महाविकास आघाडीतले प्रवक्ते रोजच न्यायालयाविरोधात भाष्य करत असतात. ‘मातोश्री’ पासून फक्त चार किलोमीटरवर गोवावाला कंपाऊंड असून उद्धव ठाकरेंना या परिसरातील एफएसआयचा रेटची सर्व माहिती होती. गेल्या दोन वर्षांत अशा अनेक जुन्या बिल्डिंग उद्धव ठाकरेंचे एजंट यशवंत जाधव यांनी विकत घेतल्या आहेत. दाऊदचे पार्टनर नवाब मलिक असल्याचे मत विशेष न्यायालयाने    नोंदवले आहे. त्यावरून सोमय्या यांनी मुख्यमंत्री यांना टोला लगावला असून उद्धव ठाकरे, यांनी शरद पवारांसोबत रस्त्यावर येत न्यायालय पाकिस्तानचे आणि न्यायाधीशही मोदींचे आहेत असे म्हटले तर नवल वाटणार नाही, असे देखील किरीट सोमय्या यावेळी म्हणाले.

Protected Content