धरणगावात नाईट ग्रुपच्यावतीने शहिदांना श्रद्धांजली

धरणगाव (प्रतिनिधी) गुरुवारी दहशतवादी हल्ल्यात भारतीय सैन्य दलातील अमर जवानांना येथील नाईट ग्रुप व परिसरातील नागरीकांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.

जम्मू च्या पुलवामा मध्ये अवंतीपुरा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड व भेकड हल्ला केला.यामध्ये भारतीय सैन्यातील 42 जवान शहीद झाले व अनेक जवान गंभीर रित्या जखमी झाले. या भ्याड हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. उरीतील दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी आजही देशवासियांच्या मनात कायम आहेत. त्यातच आजचा हा हल्ला सर्वात मोठा अतिरेकी हल्ला मानला जात आहे.दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिल्याशिवाय शांत बसता येणार नाही, अशी भावना सर्व देशवासी व्यक्त करत आहेत, याच पार्श्वभूमीवर धरणगाव शहरातील नाईट ग्रुप व शहरातील नागरिकांच्या वतीने या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.तसेच सर्व शहीद जवानांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.यावेळी परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Add Comment

Protected Content