भालोद येथे शहीद जवानांना श्रद्धांजली

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील भालोद येथे रामराज्य प्रतिष्ठान व माती फाऊंडेशनतर्फे २६/११ च्या मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेतन चौधरी हे होते . संस्थेचे अध्यक्ष दिपक जावळे उपाध्यक्ष तुषार परतणे व सदस्य खेताराम चौधरी, चेतन पाटील, योगेश कोळी, नेमिदास पाटील व तसेच रामराज्य प्रतिष्ठान मित्रमंडळ हिंगोणा यांच्या तर्फे  माजी ग्रामपंचायत सदस्य मनोज वायकोळे, गजानन बोरनारे, योगेश जंगले, ललीत बोंडे, चेतन पाटील, लोकेश गाजरे यांच्यासह रामराज्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठया संख्येत व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहुन दहशतवादी हल्यात विरमरण पावलेले शहीद स्व . मुरलीधर लक्ष्मण चौधरी यांच्यामुळ हिंगोणा या गावात त्यांच्या हुतात्मा स्मारकास अभीवादन करून त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली . दरम्यान प्रशासकीय पातळीवर एकही शासनाचा प्रतिनिधी आज देशासाठी दहशतवाद्यांशी लढतांना विरमरण पावलेल्या हिंगोण्याचा शहीदपुत्र स्व . मुरलीधर लक्ष्मण चौधरी यांच्या शहीद स्मारकास श्रद्धाजंली अर्पण करण्यासाठी न आल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

 

 

 

Protected Content