अरे व्वा : श्री राम मंदिराच्या उदघाटनासाठी जिल्ह्यातील तीन संतांना निमंत्रण

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या अयोध्या येथील श्री राम मंदिराच्या उदघाटनासाठी जळगाव जिल्ह्यातील तीन संतांना निमंत्रण प्राप्त झाले आहे.

बहुचर्चित, बहुप्रतिक्षित अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी यावल तालुक्यातील तीन संतांना नुकतेच आमंत्रण मिळाले आहे. अयोध्या येथे भव्य दिव्य असे श्रीरामांचे अद्वितीय भव्य मंदिर बांधकाम करण्यात आले. दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम राम लल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक आनंदायक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष तथा सतपंथ मंदिर संस्थान गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरि जी महाराज; अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा श्री वृंदावन धाम पाल येथील श्रद्धेय संत गोपाल चैतन्य जी महाराज आणि स्वामीनारायण मंदिर सावदा येथील कोठारी शास्त्री भक्तीकिशोर दासजी यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

याआधी राम जन्मभूमी मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी एकमेव महामंडलेश्वर जनार्दन हरि जी महाराज यांना आमंत्रण होते. यानंतर आता यावल आणि रावेर तालुक्यातील तीन संतांना राम मंदिराच्या उदघाटनासाठी निमंत्रण मिळणे ही महाराष्ट्रासाठी ही खूप गौरवाची व आनंददायक भूषणावह बाब आहे. दरम्यान, जनार्दन हरि जी महाराज हे १३ जानेवारीला २०२४ रोजी अयोध्या येथे प्रस्थान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Protected Content