उपखेड शिवारातून विद्यूत पंपांची चोरी करणाऱ्यांना तिघांना न्यायालयीन कोठडी

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील उपखेड शिवारातील शेतकऱ्यांच्या पाण्याची विद्यूत पंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. याप्रकरणी या गुन्ह्यात मेहुणबारे पोलिसांनी तीन जणांना अटक करण्यात आली होती. तिघांना न्यायालयालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील उपखेड येथील शेतकरी उद्धव अरुण मगर (वय 37) यांचे व खेड शिवारात शेती आहे. जवळच गिरणा नदी पात्रात त्यांनी पाण्याचे इलेक्ट्रिक मोटर बसवले आहे. यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी देखील काही विद्यूत पंप त्या ठिकाणी लावलेल्या आहेत. दरम्यान 22 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी पाण्याची इलेक्ट्रिक मोटर आणि केबल वायरींची  चोरून नेल्याचे उघडकीला आले होते. यासंदर्भात उद्धव मगर यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी भैय्या उर्फ गणेश निंबा पाटील (वय 28), सोन्या उर्फ दिनेश नथू ठाकरे (वय-२१)  आणि दिगंबर निंबा खैरनार (वय 23) सर्व राहणार उपखेड ता. चाळीसगाव यांना 24 सप्टेंबर रोजी मेहुणबारे पोलिसांनी अटक केली होती. त्यादरम्यान त्यांची आज पोलिस कोठडी संपल्यानंतर तिघांची न्यायालयालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

Protected Content